Breaking News

भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे नागरिकांच्या विकासाची सनद होय -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

=संविधान ग्राम दत्तक मालेवाडा येथे नागरिकांना 12 ते 35 अनुच्छेदाची दिली ओळख करून-समतादूत पज्ञा राजूरवाडे=

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या वतीने संविधान साक्षर दत्तक घेतलेल्या ग्रामपंचायत मालेवाडा या गावात भारतीय संविधानातील मूलभूत हक्क यावर ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच गावकरी यांची कार्यशाळा बार्टी च्या वतीने समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी घेतली या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की संविधानातील मूलभूत हक्कामुळे तसेच या हक्कासाठी दिलेल्या संरक्षण व उपाययोजना मुळे देशातील कोट्यवधी शोषित वंचित लोक मोकळा श्वास घेऊन सन्मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहे .

म्हणून भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे नागरिकांच्या विकासाची सनद होय. अश्या बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी प्रतिपादन केले तसेच गावकऱ्यांची कलम 12 ते 35 या कलमांची ओळख करून देताना पुढे समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की सुरवातीला सात प्रकारचे मूलभूत हक्क दिले मालमत्तेचा हक्क हा वादग्रस्त ठरल्यामुळे 1978 च्या 44 व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातून काढून टाकले आहे आता सहा प्रकारचे मूलभूत हक्क नागरिकांसाठी आहेत समतेचा हक्क अनुच्छेद 14 ते 18 (2)स्वतंत्रचा हक्क कलम 19ते 22(3)-शोषनाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 (4)-धार्मिक स्वतंत्रचा हक्क कलम २५ ते २८ (5)-सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम २९ ते ३० हे आहे.

व सर्वात महत्त्वाचे कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे या 32 व्या कलमाचे महत्व सांगताना संविधान सभेत बाबासाहेब म्हणाले की ज्या कलमा वाचून घटना निरर्थक ठरली असती असे सर्वात महत्वाचे कलम कोणते?असे जर मला कोणी विचारले तर कलम 32 शिवाय दुसऱ्या कोणत्याही कलमाचा निर्देश मला करता येणार नाही या कलमामुळे नागरिकांच्या दिलेल्या मूलभूत हक्काना सविधांनात्मक संरक्षण मिळते अशी पूर्णपणे मूलभूत हक्क आपले कोणते आहे तसेच 2002 च्या 86 व्या घटना दुरुस्ती मुळे कलम 21 (अ)मंध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला. या सर्व कलमाची समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी ओळख करून दिली.

या कार्यशाळेला उपस्थित मालेवाडा ग्रामपंचायत चे सरपंच कालिदास भोयर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य शंकर दडमल, वर्षा दोडके ,रेखा वरखेडे, शारदा मेश्राम, दडमल, तंटामुक्ती अद्यक्ष बंडू घोडमारे,कविता पाटील, रेखा चौधरी, राशिका चौधरी, आदि उपस्थित होत्या तर कार्यक्रम चे संचालन स्मिता राऊत यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका ललिता वरखेडे यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved