Breaking News

कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 30 जून : भोयगांव-कवठाळा- गडचांदुर या मार्गावर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्याजाण्याकरीता रस्ता अपूरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळ कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

कवठाळा ते गडचांदूर हा रस्ता जड वाहनाकरीता पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचना केली होती. त्याप्रमाणे मुंबई पोलिस अधिनियम-1951 च्या कलम- 33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, सदर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

यापूर्वी 2 जून ते 30 जून 2022 पर्यंत वाहतूक बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण न झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविल्यामुळे 30 जुलै 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंदी ठेवण्यात आली आहे. जनतेने पर्यायी मार्ग म्हणून गडचांदुरकडून चंद्रपुरकडे येणारी जड वाहतूक ही गडचांदूर- राजुरा-बल्लारशा-चंद्रपुर या मार्गाचा वापर करावा. तसेच गडचांदुरकडून घुग्घुसकडे जाणारी जड वाहतुक ही गडचांदुर-आवाळपुर-गाडेगांव-कवठाळा- भोयगांव-घुग्गुस या मार्गांचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू …

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved