Breaking News

शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करा अन्यथा मंत्रालयासमोर ठिय्या करणार

वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनातून शेतकरी व मनसेचा मुख्यमंत्र्याना इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :-वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती या दोन्ही योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी व प्रोत्साहन राशी व अतिवृष्टी (पूरग्रस्त) शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत त्वरित देण्यात यावी अन्यथा मुंबई मंत्रालयासमोर ठिय्या देऊ असा इशारा वरोरा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलन दरम्यान शेतकरी व मनसे नेते रमेश राजूरकर जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष राहुल बालमवार,जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विनोद सोनटक्के इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी मनसे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

भाजप सेना युतीने सन २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी दिनांक १.४.२०१२ व त्यानंतर पिक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अश्या कर्जापैकी दि. ३०.६.२०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही निकषाच्या अधिन राहून सरसकट कर्जमाफी दिली व जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रूपये जाहिर करण्यात आले. दरम्यान ज्या बँक खात्यात शेतकऱ्यांचे खाते होते त्या बँक शाखेत शासनाकडून निधी जमा करण्यात आला नसल्याने त्या बँकेने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे निकालीत न काढता त्यांनी सरकार कडून निधी आला नसल्याने तुमची कर्जमाफी किंवा कर्ज माफ होवू शकत नाही असे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले. दरम्यान चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तालुक्यातील १८ शेतकरी यांनी सरकारच्या या फसवणुकीच्या धोरणाविरोधात लढा उभारला व अनेकवेळा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क करून निवेदन दिले शिवाय अनेकवेळा मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राचार केला पण अजूनपर्यंत शासन प्रशासनाकडे निवेदने व तक्रारी दिल्यानंतर सुध्दा या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक महिन्यांपूर्वी वरोरा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री (आपणाकडे) यांच्याकडे निवेदन दिले होते पण तरी सुद्धा शासनाने कर्जमाफी दिली नाही त्यामुळे आज ठिय्या आंदोलन करून आपल्या शासनाचे लक्ष वेधलं आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

भाजप सेनेच्या सरकार मधे सन २०१७ ला पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज सन २०१९ पर्यंत तसेच राहिल्याने संबंधित शेतकऱ्यांना नविन कर्ज मिळाले नाही. पर्यायाने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नसल्याने स्वतःची शेती पडीत ठेवावी लागली ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान सन २०१९ मध्ये ठाकरे सरकार (महाविकास आघाडी) अस्तित्वात आले आणि या सरकारने सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या योजनेत आपण पात्र ठरू या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली व आपली व्यथा स्थानिक प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा मांडली मात्र तत्कालिन अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केल्यानंतर सुध्दा कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे जवळपास पाच वर्षापासून वंचित शेतकऱ्यांची शासन प्रशासनाकडे पायपिट सूरू आहेत.

खरं तर हे राज्य शिवछत्रपतींच्या नावाने चालवतो असा आशावाद आपण जनतेला दाखवून त्यांच्या नावाच्या योजनेचा जर बटटयाबोळ करत असाल तर आपण खऱ्या अर्थाने शिवछत्रपतीच्या नावाचा गैरवापर करतो हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित देऊन त्यांची कर्जमुक्ती करावी व शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन राशी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना त्वरित निधी द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा भद्रावती या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मुंबई च्या मंत्रालयासमोर ठिय्या व आमरण उपोषण करेल असा इशारा सरकारला देण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर. तालुका उपाध्यक्ष राम पाचभाई, प्रशांत बदकी, विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर, विशाल देठे, उपविभाग अध्यक्ष धनराज बाटबरवे, भद्रावती शहर अध्यक्ष युगल ठेंगे, प्रतीक मुडे बाळू गेडाम. उत्तम चिंचोलकर व असंख्य शेतकऱ्यांची इत्यादींची उपस्थिती होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved