Breaking News

डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने महान विचारवंताला मुकलो – डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि.22 सप्टेंबर : सुप्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ व साहित्य जगात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अचानक निर्वाण, मनाला चटका लावून गेले आहे, अश्या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपली शोक संवेदना व्यक्त केली आहे.

सामाजिक व राजकीय जीवनात काम करीत असतांना भाऊंची अनेक विद्वत्तापूर्ण व्याख्याने ऐकण्याची संधी लाभली. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धर्मावरील विद्वत्ता वाखाणण्याजोगी होती. नागपूर विद्यापीठातील त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांची व शिक्षक वर्गाची खूप गर्दी असायची कारण आपल्या प्रत्येक व्याख्यानात भाऊ बौद्ध धम्मा विषयी नाविन्यपूर्ण गोष्टी विषद करीत असे. त्यांच्या विद्यापीठाच्या बाहेरील व्याख्यानाला सुद्धा लोकांची गर्दी असायची. एकंदरीत नागपूरचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विश्व भाऊंनी समृद्ध केले.

पाली विषयात संशोधन व लिखाण करीत असतांना त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत हिरीरीने सहभाग घेतला. भाऊ लोखंडे हे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. त्यांच्या दुःखद निधनाने एका अभ्यासू विचारवंताला देश मुकला आणि समाजाची अपिरिमित हानी झाल्याची खंत डॉ.राऊत यांनी व्यक्त केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

गौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती

नागपूर : “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी गौरव गुप्ता यांची नियुक्ती करण्यात …

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि. १९ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved