
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमुर :- चिमूूर शहरातील सर्व जनतेला आव्हान (सुचित)करण्यात येत आहे की, कोरोना विषाणू रूग्णांची संख्या वाढलेली असल्याने रूग्णांची साखळी तोडण्याकरीता जिल्हयातील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तर्फे दिनांक २५/०९/२०२० ते ०१/१०/२०२० पर्यत जनता कर्फ्यू पाडण्याचे ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने चिमूर शहरात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व नागरीकांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हावे.
जनता कर्फ्यू मध्ये रूग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालये, दुध वितरण, पार्सल सुविधा, पेट्रोल पंप, वर्तमानपत्र वितरण, एम.आय.डि.सी. मधील सर्व आस्थापना, सुरू राहतील तसेच बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद राहतील. या व्यतीरिक्त संपुर्ण दुकाने आस्थापना, बंद करून सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.