
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी अटी व शर्थी लागु करण्यात आले आहे. आज ताडोबा व्याप्रकल्पाच्या प्रमुख मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली गेटवरून पहील्याच दिवशी २२ जिप्सी सोडण्यात आली आहे.
एका जिप्सीमध्ये सहा ऐवजी आता फक्त चारच पर्यटकांना आदेशानुसार बसण्याची करण्यात आली आहे. सर्व पर्यटकांना मॉस्क व सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. जिप्सीमध्ये बसणाऱ्या सर्व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सकाळच्या पहिल्या फेरीपूर्वी प्रवेशद्वारावर विधीवत पूजन करण्यात आले व त्यानंतर पर्यटकांसाठी प्रवेशद्वार खोलण्यात आले. गर्भवती महिला व दहा वर्षाखालील मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी पर्यटस्थळी बंदी घालण्यात आले आहे.
संपूर्ण जगभरात कोराना महामारीमुळे पर्यटन बंद करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे.येथे देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते, तसेच महाराष्ट्रात लॉकडाउन सातत्याने सुरूच असल्याने मागील सहा महिन्यापासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्यात आले.
पर्यटन बंद असल्याने मोठे नुकसान झाले मात्र आता पुर्ववत ताडोबा पर्यटन सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह व आंनद व्यक्त करतांना दिसत आहे.