Breaking News

शेतीच्या हंगामात विज पडून बैल ठार – शेतकरी सापडला संकटात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव येथील आनंदराव घरत यांचा बैल सकाळी विज पडून जागेवरच ठार झाला ऐन शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने घरत यांच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे.

आज पहाटे विजेच्या कडकडाट मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली,
यावेळी पिंपळगाव परिसरात जोरदार विजेचा तांडव सुरू होता अचानक वीज गावात कोसळली सदर विजेचा धक्का आनंदराव घरत यांच्या गोठ्यात बाहेर बांधलेल्या बैलाला लागला.

यात बैल जागीच ठार झाला परंतु कोणतीही मनुष्यहानी झाली नाही सदर बैलाची धूर मोडल्याने घरत यांच्यावर संकट कोसळले आहे शेती कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे सदर बैलाची किंमत 50 हजाराच्या वर असल्याने घरत यांचा मोठे नुकसान झाले आहे तेव्हा प्रशासनाने सदर बाबीची दखल घेऊन बैलं मालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved