Breaking News

लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार

संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयातला स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज. लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेले राष्ट्रीयत्व. संपूर्ण देशाला एका सुराने एकवटण्याचा दैवी आवाज ईश्वराने त्यांना दिला होता. भारताची जागतिक पातळीवरची ओळख लतादीदी होत्या. आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या सुमधुर गीतांनी मंतरलेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस घरातील प्रत्येकाला शोकाकूल करणारा आहे. नागपुरात लतादीदी जेव्हा जेव्हा आल्यात, त्यावेळी त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. आमचं बालपण, आमचं तारुण्य,आमचं कार्यकर्तृत्व फुलवण्याचं काम या एका अजरामर आवाजाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्या ‘ए मेरे वतन के लोगो ‘, हे गाणं ऐकताना भावनिक झाले होते. त्यांचा सूर असा ह्दयाला हृदयाशी जोडणारा होता. आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत आणि मानवी समाजामध्ये ऐकण्याची कला जीवंत असेपर्यंत लतादीदींना कोणीही विसरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचे जाणे,संपूर्ण भारतीय समाजाला जागतिक स्वर -सुरांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सुरेल व अजरामर गीतांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या देशभक्तीला शतशः प्रणाम करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

 

सुनील केदार

पशुसंवर्धन,दुग्धविकास युवक कल्याण व क्रीडा मंत्री, महाराष्ट्र

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved