Breaking News

आठवडी बाजार सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

बल्लारपूर :- आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कचेरी समोर भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी
भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला.
कोरोनाच्या काळात मागील वर्षीपासून बाजारपेठा व आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व हाल होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य असा हमी भाव मिळत नाही, आठवडी व दैनंदिन बाजारपेठ बंद असल्याने मालाची नुकसान सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकारने मोठमोठे मॉल, दारूची दुकाने व इतर व्यवसाय सुरू करण्याची सुट दिली आहे आणि आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद ठेवण्यात येत आहेत. सरकार व प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे पिकवलेल्या शेतमालाला विकायचे तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरू असता तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून चार पैसे मिळाले असते. शेतकरी मोठ्या कष्टाने रक्ताचे पाणी करून भाजीपाला पिकवत आहे परंतु आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद असल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागत आहे. सरकार व प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. यावर सरकारने तात्काळ लक्ष देऊन भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी व त्यांच्या मालाला योग्य व रास्त भाव मिळण्याकरिता आठवडी बाजार व दैनंदिन बाजार तात्काळ सुरू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली.

शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने केराची टोपली दाखवली तर या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कचेरीवर शेतकऱ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार
असा इशारा राजूभाऊ झोडे यांनी सरकार व प्रशासनाला दिला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved