जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर क्रांती भूमि आणि शहिदांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने चिमूर आष्टी क्रांती बस सुरू करून दिलेला सन्मान सत्ताधिकारी व जन प्रतिनिधींचा डोळयात खूपला असून स्वतः काहीच करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं तर त्यांचं पोट दुखायचं, क्रांती भूमीवर बेगडी प्रेम, शहीदा प्रति खोटा व देखाव्याचा आदर!
चिमूर आष्टी क्रांती भूमीला व शहिदांना देशपातळीवर सन्मान मिळावा म्हणून सत्ताधिकारी व जन प्रतिनिधींकडे कोणतेही नियोजन नाही स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाप्रमुख सारंग दाभेकर यांनी चिमूर आष्टी क्रांतिभूमी ला व शहिदांना देशपातळीवर सन्मान मिळावा याकारिता चळवळ सुरु करून सर्वप्रथम चिमूर आष्टी क्रांती एक्सप्रेस बस फेरी सुरू करण्यात यश मिळवलं आणि क्रांतिभूमी व शहिदांचा सन्मान केला. मात्र जनप्रतिनिधी व लोक प्रतिनिधींना सत्ताधिकाऱ्यांना क्रांतिभूमी चा हा सन्मान पचनी पडला नाही. आणि त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून राज्य परिवहन महामंडळावर दबाव आणून चिमूर आष्टी बस फेरी बंद केली यामुळे जन प्रतिनिधी आणि लोक प्रतिनिधींच्या मनातील क्रांतिभूमी व शहीदा प्रति किती आणि कोणते प्रेम श्रद्धा व सन्मान आदर आहे हे उघड झाले आहे. याद्वारे जनतेला विनंती करण्यात येते की 75 वर्षांनंतर का होईना चिमूर आष्टी क्रांती भूमीला आणि शहिदांना देश पातळीवर सन्मान मिळवण्याच्या चळवळीला अंगीकारले पाहिजे आणि सत्ताधारी व जन प्रतिनिधी लोक प्रतिनिधींना क्रांतिभूमी करिता देश पातळीवरील विकास कामाचे नियोजन करण्याकरिता बाध्य केले पाहिजे. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे चिमूर आगारास विनंती आहे की, जर महामंडळाला चिमूर आष्टी बस फेरी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसेल तर किमान आगाराची प्रत्येक बस चिमूर आष्टि क्रांती एक्सप्रेस म्हणून विशेष रित्या पेंटिंग करण्यात यावी जेणे करून ह्या सर्व बसेस ज्या मार्गाने धावतील व ज्या गाव तालुका जिल्ह्यापर्यंत पोहचतील त्या-त्या ठिकाणी चिमूर आष्टी क्रांतीचा इतिहास जागृत ठेवतील त्यामुळे लोकांना चिमूर आष्टी चा इतिहास सतत आठवणीत राहील यानिमित्ताने जिकडे – तिकडे त्या इतिहासाची चर्चा होईल पर्यायाने। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यास चिमूर आणि आष्टी या दोन गावाचा फार मोठा सहभाग आहे हे देशाला कळेल. आज परिस्थिती पाहतो म्हटलं तर चिमूर आणि आष्टी चा इतिहास त्याच तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यातच माहित नाही. ही शोकांतिका असून खेदाची बाब आहे.