Breaking News

बोगस बियांनाना शेतकरी बळी पडू नये-कृषी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

नेरी :- सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय केसळवाडा (वाघ) ता.लाखनी जि. भंडारा येथे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत ओंकार कोवे , मेजय मेश्राम ,अमित डाहूले, पियुष रंदये , पुष्कर रंदये यांनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ झाली पाहिजे,तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा दर्जा उंचावला पाहिजे म्हणून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कपाशीवर बोंडअळया, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. नुकसानीचा प्रकार व एकात्मिक व्यवस्थापनाच्या बाबी समजावून घेणे आवश्यक ठरते. वेळीच योग्य व्यवस्थापनाची खबरदारी घेतल्यास आपण शेंदरी बोंडअळीपासून होणा-या नुकसानीपासून आपले बहुमूल्य पीक वाचवू शकतो.चारा प्रक्रिया ,मोबाईल अँप चा वापर ,सेंद्रिय शेती ,मित्र तसेच शत्रू किडे ,बियाणांची उगवण क्षमता तपासणे अश्या अनेक विषयांवर प्रात्यक्षिके करून दाखवले.
बोगस बियाणे अनेकदा बाजारात येतात व त्यास बळीराजा बळी पडतो हे अश्या बोगस बियांनाना शेतकरी बळी जाऊ नये तसेच बियाणे कसे ओळखावे या साठी सिड्स टॅग व त्यांचा रंग या विषयी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू …

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved