
शाळा व्यवस्थापन समितिचे तहसीलदारला निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर- जिल्हा परिषद शाळेला अगदी जवळ लागुनच असलेली 50 वर्ष जुनी पिण्याच्या पाण्याची टाकी पुर्णपणे जिर्णवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका असल्यामुळे ही पिण्याच्या पाण्याची टाकी पाडण्यात यावी, या करीता पाण्याच्या टाकी संदर्भात जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती तर्फे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना निवेदन देण्यात आले.
नगर परिषद हद्दीतील अभ्यंकर मैदान येथील 1972 साली निर्माण केलेली पाण्याची टाकी ही जिर्णवस्थेत असून आता पावसाळा सुरु असल्यामुळे 10 जुलाई रोज रविवारला पाण्याच्या टाकीच्या जिन्याच्या पूर्ण पायऱ्याचा भाग शाळेच्या भिंतिला लागून पडला व भिंत हादरली, रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांची जीवित हानी टळली, पाण्याच्या टाकीला लागुनच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुले ही 1 ते 4 वर्गाची लहान मुलांची शाळा भरते,
पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण झाल्यामुळे वारंवार त्यांचे प्लास्टर शालेय इमारती वर कोसळने सुरु आहे, त्यामुळे लहान मुलांच्या जीवनाला 100℅ धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन अवगत करण्यात आले आहे. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या उद्देशाने निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते, लक्ष्मीकांत बावनकर, प्रमोद हिंगे, किरण सातपुते, मोहनीश जुमड़े, अशोक मेश्राम, सौ. सोनू बावनकर, सौ. दीपाली बावनकर, व इतर पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.