विशेष प्रतिनिधी
वर्धा:-सावली सा. येथील शेतकऱ्यांची सेविंग खात्यामधली रक्कम कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आली होती, पंजाब नॅशनल बँक चे मॅनेजर टाळाटाळ करीत होते. याबाबत शेतकऱ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख गणेश ईखार यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ जिल्हा अग्रनी बँकेचे लहाने साहेब यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला,
व गणेश ईखार यांनी पंजाब बँकेचे मॅनेजर यांना खडे बोल सुनावले की अशा परिस्थितीत कोणत्याही शेतकऱ्याची रक्कम कपात करू नका व शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून द्या यापुढे कोणतीही तक्रार आल्यास शिवसेना पदाधिकारी थेट पंजाब बँक गाठून शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख गणेश ईखार यांनी दिला, माजी उपसरपंच सुधीर वाघमारे, शिवसेना सचिव सुरज गुळघाणे, प्रफुल सिद, राहुल सिद, अनिल चांभारे, यांनी त्याचे आभार मानले