जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तहसील कार्यालय अंतर्गत प्राधिकृत रास्त भाव दुकानदारांच्या थकित कमिशन तथा इतर मागण्यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी शासकिय रास्तभाव दुकानदार संघटना चिमूर यांनी निवेदनातुन तहसील कार्यालयास केली होती.मात्र याकडे प्रशासणाने दुर्लक्ष केल्याने रास्तभाव दुकानदार आक्रमक होऊन एल्गार पुकारला असुन ७ फरवरी ते ९ फरवरी पर्यंत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
तहसील कार्यालया अंतर्गत रास्त भाव दुकानदाराच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.ज्यात माहे एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे रास्तभाव दुकानदारांचे मार्जिन रक्कम तात्काळ अदा करण्यात यावे.नोव्हें. २०२२ चे नियमित धान्याचे चालान भरलेले ७८ दुकानदारांचे रू.५,३९,५६६/- परत मिळावे,नोव्हें २०२० मध्ये शिधापत्रिका धारकांना वितरीत करण्यासाठी मका हे धान्य मंजूर करून चलान भरून घेण्यात आले.परंतू मका हे धान्य वितरणा करीता देण्यात आले नाही या भरलेल्या चलनाचे पैसे दुकानदारांना परत द्यावे,
दुकानदारांना इ-पॉस मशिनमधुन पावती काढण्यासाठी कागदाचे रोल नियमित व मुबलक प्रमाणात वितरीत करण्यात यावे.
शिधापत्रिका धारकांना वितरीत करण्यासाठी धान्य वेळेत दुकानात पोहचवावे,तालुक्यातील ज्या दुकानदारांना प्रधानमंत्री करीब कल्याण योजनेचे माहे नोव्हें. व डिसेंबर २०२२ चे धान्य मिळाले नाही ते तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.सदर मागण्या करीता चिमूर तहसील कार्यालया पुढे तिन दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्या आले आहे.९ फरवरी पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीतर यांनतर तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शासकिय रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगीतले.धरणे आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षासह सचिव बबन बन्सोड,उपाध्यक्ष अशोक तिडके,कोषाध्यक्ष कापुरदास सहारे,सदस्य जनार्धन गोन्नाडे, देवराव दांडेकर,रेखा देवतळे,कमला चौधरी,स्वप्निल सावरकर,लहु पाटील इत्यादीसह तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार सहभागी झाले.