Breaking News

चिमूर नगर परिषद ने प्रत्येक प्रभागात पाणी पुरवठा करावा नाहीतर पाणी पट्टी कर माफ करावा

काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पू शेख यांचा सवाल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर नगर परिषदेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून 51 कोटींच्या पिण्याच्या पाण्याची योजना येऊन तीन वर्षापासून अजून पर्यंत काम पुर्णे झाले नाही, कामाची कालावधी पूर्ण होऊन सुध्दा चिमूरची जनता पाण्यासाठी भटकंती करीत आहे. ग्राम पंचायत असतांना सुध्दा दररोज नळाला पाणी पुरवठा नियमित होत असायचा मात्र नगर परिषदेच्या काळात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर परिषद झाली आणि पाच वर्षे सुध्दा नळाला काही भागात वडाळा पैकु, माणिक नगर, वेलकम कॉलोनी , सौदागर नगर तिरखुरा रोड , कडकुड नगर वडाळा, पेट मोहल्ला, आझाद वार्ड, गांधी वार्ड असे अनेक ठिकाणी पाणी येत नाही.

 

चिमूर येथील बंदरा पुर्ण कोरडा पडला असुन सुद्धा दुर्लक्ष होतांनी दिसत आहे,नळाला पाणी पुरवठा बरोबर होत नाही आहे. एक दिवसाचा आळ नळ येतो परंतु पूर्णे पने येत नाही. याकडे नगर परिषद अजून पर्यंत उपाय योजना का नाही करत दिवसाने दिवस तापमान वाढत चालले आहे. जनतेची ताण वाढत चालली आहे. नगर परिषद मकान कर,दिवा बत्ती कर, साफ सफाई कर, आणि पाणी पट्टी कर भरण्या करीता सक्ती लावतात मग जनतेला पुर्ण पने पाणी का देत नाही. असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी केले आहे.
तरी तात्काळ नगर परिषदेने पाण्याची व्यवस्था करावी न केल्यास नगर परिषदेच्या समोर आंदोलन करण्यात येईल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

२७ एप्रिल निषेध दिन – शिक्षक भारतीचे शिक्षकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात …

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved