वर्धा – सुरज गुळघाने
वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा येथील मॅनेजरने शेतकऱ्यांना कृषी कर्ज सेटलमेंट कराला लावले व सांगितले की तुमी आता कर्ज भरा व लगेचच तुम्हाला नवीन कृषी कर्ज देतो अशा आशेने शेतकऱ्यांनी लोकांकडून उसने पैसे आणून बँक मध्ये भरले मात्र आता दोन वर्षे उलटूनही मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यास बँक मॅनेजर टाळाटाळ करत आहे.
सावली येथील शेतकऱ्यांनी कृषी कर्जाबाबत मॅनेजरला विचारणा केल्यास मी मेल पाठवला तुम्हाला सांगतो हेच उत्तर नेहमी सांगण्यात येते मात्र दोन वर्षांपासून हेच उत्तर ऐकून शेतकरी त्रस्त झाले आहे.
काही शेतकऱ्यांना कागदपत्रे तयार करायला सांगितले मात्र बँकेमध्ये कागदपत्रे घिऊन आल्यावर सांगतो की आता तुमाला कर्ज मिळणार नाही परंतु असा मानसिक त्रास शेतकऱ्यांना देत आहे यासाठीच सावली येथील शेतकऱ्यांनी थेट रिजर्व बँक कडे तक्रार दाखल केली व सांगितले की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर थेट पंजाब बँकेलाच कुलूप ठोकू,बँक शेतकऱ्यांसाठी नाही तर कोणासाठी आहे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.