जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भद्रावती:-शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने गावागावात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी “होऊ द्या चर्चा” कार्यक्रम जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील धानोली, पावना व पेवर या गावात चंद्रपूर जिल्हा वक्ते ओमराजे खांडविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फसव्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रम राबविण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा – भद्रावती विधानसभेतील प्रत्येक गावा गावात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी “होऊ द्या चर्चा” करूया बोलवेड्या कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील धानोली, पावना व पेवर या गावात शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा वक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांशी संवाद करून काळा पैसा भारतात आला का, १५ लाख रुपये बँक खात्यात आले का, सर्वांना पक्की घरे मिळाली का,
बेरोजगारांना नोकरी मिळाली का, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का, नवीन उद्योगधंदे आले का, महागाई कमी झाली का, घरगुती गॅसवरील सबसिडी बंद का केली, असे अनेक प्रश्न विचारत ‘होऊ द्या चर्चा अभियानांतर्गत सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमीत निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश जीवतोडे असंख्य स्थानिक नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.