सततच्या संकटाने बळीराजा हवालदिल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था मुख्य कणा शेती आहे.मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून बळीराजा निसर्गाच्या प्रकोपचा सामना करता-करता पूर्णता:हतबल झाला असुन अर्थव्यस्थेचा कणा डाम -डोल स्थितीत आहे.एकंदरीत निसर्गाने रचलेल्या नैसर्गिक चक्रव्यूहात बळीराजाची स्थिती ही अभिमन्यूसारखी झाली आहे.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.संततधार मुसळधार पावसाने दुबारा पेरणी करुनही हातात पीक येणार की नाही यांची शास्वती नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.जगात तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी नैसर्गिक संकटाना तोंड देईल असे यंत्र विकसित होणे शक्य नाही.गेल्या दोन -तिन वर्ष कोरोना या जागतिक आजाराने शेतकरी राजासह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले.जवळपास तीन वर्ष सर्व आर्थिक व्यवहार बंद राहिले.तरी पण बळीराजा आपले शेतीचे कार्य पूर्ण करण्यासाठी कर्ज बाजारी होउन नव्या जोमात शेती करु लागला.परतु या वर्षी हातात येणार अश्या वेळेस निसर्ग राजाने आपले चक्र फिरवून ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे सोयाबीन पीक पिवळे होऊन हाती आलेले सोयाबीन पिक पिवळे पळून हातुन निघुन गेले.
* बळीराजाला तत्काळ मदत करा *
बळीराजावर सध्यू निसर्गाच्या अवकृपेने कर्जबाजारी होऊन हवालदिल होण्याची वेळ आली आहे.जगाचा पोशिंदा संकटात असताना सुद्धा शासनाकडून थेट मदत न मिळता केवळ घोषणांची पाऊस सुरू आहे.महसुल विभागाकडून मौका पंचनामे करण्याचे कार्य सुरू आहे.परंतु लवकरात लवकर दिवाळी पूर्व शासकीय मदत देण्यात यावे.