प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-२३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधिमंडळावर काढलेल्या मोर्चात पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. आज या घटनेला 29 वर्ष पूर्ण होऊन तीस वे वर्ष लागत आहे. ज्या मागण्यासाठी ११४ गोवारी समाजबांधव शहीद झाले ती मागणी अजूनही तशीच आहे. उच्च न्यायालयाने गोवारी समाजाच्या बाजूने निकाल देऊनही गोवारी समाजाचा लढा अजूनही कायम आहे.
लाठीचार्जमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत जे ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते त्या शहीद आदिवासी गोवारी बांधवांना, दवलामेटी तील हेटी गावात श्रद्धांजली देण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाला आदिवासी गोवारी युवा जन विकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष गोपालजी वरठी, एस के दूधकोहळे तसेच कार्यक्रमाच्या आयोजक विशाल नेवारे, प्रशांत सोनवणे, अतुल भोंडे, नरेश भोंडे ,उमेश शेंद्रे, ईश्वर राऊत , ज्ञानेश्वर भोंडे ,यश नेवारे, शुभम भोंडवे, गोलू राऊत, विठ्ठल भोंडवे, दीपक ठाकरे ,महेंद्र नेवारे ,रोशन नेवारे, गौरव भोंडे, पिहू नेवारे, सोहम भोंडवे, वामन वाहने तसेच गावातील महिला मंडळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.