जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चिमूर तालुका शिवसेना मार्फत नागपूर येथील 2023 चे हिवाळी अधिवेशन येथे शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता (विधानपरिषद) यांची भेट घेऊन चिमूर तालुक्यातील पीकविमा, अतिवृष्टी, व नुकसान भरपाई याबद्दल निवेदन सादर करून चर्चा केली. व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावे यासाठी निवेदन सादर केले.यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊन, हाती आलेले पीक सडून फसलं वाया गेली.
सोयाबीन व कापूस या पिकावर अतिवृष्टी सोबतच अनेक रोगांचा फटका बसला, यामुळे शेतीच्या खर्चाचा डोंगर (खत, बी -बियाणे, फवारणी, कीटकनाशके व इतर खर्च )उत्पन्नाच्या 2पट आलेला आहे. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची दाखल घेण्यासाठी महसूल मंत्री यांचा दौरा या परिसरात होऊन सुद्धा शेतकरी पीकविमा, नुकसान भरपाई,व अतिवृष्टीच्या लाभपासून वंचित आहेत. हा विषय आपल्यामार्फत अधिवेशनात मार्गी लावावा असे निवेदन चिमूर विधानसभा समन्वयक शिवसेना भाऊराव ठोंबरे व उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव यांनी नागपूर येथे शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता विधानपरिषद यांना सादर केले.