Breaking News

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्याचे शिवसेनेमार्फत विरोधी पक्ष नेत्यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चिमूर तालुका शिवसेना मार्फत नागपूर येथील 2023 चे हिवाळी अधिवेशन येथे शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता (विधानपरिषद) यांची भेट घेऊन चिमूर तालुक्यातील पीकविमा, अतिवृष्टी, व नुकसान भरपाई याबद्दल निवेदन सादर करून चर्चा केली. व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावे यासाठी निवेदन सादर केले.यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊन, हाती आलेले पीक सडून फसलं वाया गेली.

सोयाबीन व कापूस या पिकावर अतिवृष्टी सोबतच अनेक रोगांचा फटका बसला, यामुळे शेतीच्या खर्चाचा डोंगर (खत, बी -बियाणे, फवारणी, कीटकनाशके व इतर खर्च )उत्पन्नाच्या 2पट आलेला आहे. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची दाखल घेण्यासाठी महसूल मंत्री यांचा दौरा या परिसरात होऊन सुद्धा शेतकरी पीकविमा, नुकसान भरपाई,व अतिवृष्टीच्या लाभपासून वंचित आहेत. हा विषय आपल्यामार्फत अधिवेशनात मार्गी लावावा असे निवेदन चिमूर विधानसभा समन्वयक शिवसेना भाऊराव ठोंबरे व उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव यांनी नागपूर येथे शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता विधानपरिषद यांना सादर केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved