अतिवृष्टी,बोनस आणी पीकविमा यांचा विसर
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड
नागभीड:-धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजून प्रयन्त शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही.आगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच आक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. अनेक शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले. त्याचे पंचनामे झाले. मात्र ना शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला ना शासनाची मदत. ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने धान पिकाचे नुकसान झाले होते. त्यावेळीही शासनाने नुकसान भरपाई देण्याचे आस्वासित केले होते. तसेच आगस्ट मधील अतिवृष्टी या बाबतही पंचनामे करून मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता मार्च महिना संपत असूनही शेतकऱ्याची निराशाच होत आहे. आता लोकसभेचे बिगुल वाजले आहे. तरीही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानीची एकही रक्कम जमा झाली नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी घेतलेले बँकाचे, सोसायटी यांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे.
नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था यावरच अवलंबून आहे. दुसरे कोणतेही कामधंदे किंवा उद्योग या भागात नाही. त्यामुळे येथील शेतकरी शेतीवर अवलंबून आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी वारला –दुष्काळ हा शेतकऱ्याच्या माथी ठरलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. शासनाने बोनस घोषित करून निम्म अश्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, 90 टक्के शेतकरी बाकी आहेत,अतिवृष्टीचे व अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले. तेही नुकसान भरपाई मिळाली नाही.घेतलेले पीक कर्ज, मुलाचे शिक्षण, मुलींचे लग्न कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आवसून उभा आहे.