शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथून पाच कि.मी अंतरावर असलेल्या सावरगाव येथील परधानहेटीत असलेल्या रान तलावाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने रब्बी हंगामातील पिकावर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले आहे.रान तलावातून खरिप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा पुरवठा होतो.पण तलावातून शेतकऱ्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याच्या नहर नसल्याने खरिप व रब्बी ह्या दोन्ही हंगामात शेतकऱ्या समोर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले आहे.तलावाचे पाणी मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकरी धडपड करित असतो अशातच तलावात खुप गाळ असल्याने तलाव खोलीकरण झाले नसल्याने पाण्यासाठी वाद होत असतात.
रब्बी हंगामात तर संपूर्ण शेती खालीच असते,पाटबंधारे विभाग चिमुरकडे वारंवार पाठपुरावा केला पण दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांसमोर प्रचंड संकट निर्माण झाले आहे.शेती कशी करावी? पोट कसे भरावे?असा सवाल शेतकरी उपस्थित करित आहे.सावरगावात बहुतांश शेतकरी धानावर अवलंबून असतात रब्बी हंगामात तलाव पुर्ण खालीच होतो. त्यामुळे चणा,लाखोरी,गहु हे पिक घेतले जात नाही.त्यामुळे शेती रब्बी हंगामात पडीत असते . पाटबंधारे विभागाने त्वरित खोलीकरण व शहर न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कवडू लोहकरे यांची प्रतिक्रिया
रान तलावाचा गाळ उपसा करून खोलीकरण करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर नहर नसल्याने पाणी शेतात पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.पाटबंधारे विभागात वारंवार जाऊन पत्रव्यवहार करण्यात आला पण दुर्लक्ष केले.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.