पुस्तक प्रकाशन,कविसंमेलन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-ग्रामीण भागात साहित्य चळवळी चालवणे मोठे कठीण आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाचा संघर्ष आणी जीवनमान भावी पिढीला समजण्यासाठी ग्रामीण कवींना चालना मिळणे गरजेचे आहे.देशातील जातीय,धार्मिक व पंथीय विद्वेषात माणूस दुर्मीळ होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यीक तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील यांनी व्यक्त केली.
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण,दाई जंगो रायताड गोंडियन बहुउद्देशिय संस्था तथा आफ्रोट तालुका शाखा चिमूरच्या यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समीती चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती येथे कवी प्रकाश कोडापे यांच्या संघर्ष काव्यसंग्रहाचे प्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा कविसंमेलन शनिवार २४ जूनला आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ऍड. भूपेश पाटील विचारमंचावरून बोलत होते.संघर्ष या काव्यसंघर्षावर बोलताना त्यांनी देशातील महामानवाच्या संघर्षाचे दर्शन या संघर्ष काव्यसंग्रहात कवी प्रकाश कोडापे यांनी मांडल्याचे त्यांनी सांगितले.यावेळेस विचार मंचावर अध्यक्षस्थानी भद्रावती येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुधीर मोते,प्रमुख अतिथी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. देवमन कामडी,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद किन्नाके,डॉ.प्रकाश वट्टी,कवयित्री कल्पना गेडाम,सामाजिक कार्यकर्ते सुंदर गावडे,कवी राजू डहाके,कवी प्रविन आडेकर,तुळशीराम महल्ले,बबिता कोडापे आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमाना मार्ल्यापन तथा द्विप प्रज्वलित करण्यात येऊन कार्यक्रमास रितसर सुरुवात झाली.यावेळेस अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.सुधिर मोते यांनी हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी,कवि, साहित्यीक तथा सामान्याही प्रेरणा मिळविण्या करीता असल्याचे गौरवोद्गार काढले.मान्यवरांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक म्हणुन रुजु झालेले डॉ. आंनद किन्नाके तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन तथा पुस्तक प्रकाशनावर भाष्य कवी सुरेश डांगे यांनी केले. प्रास्ताविक कवी प्रकाश कोडापे यांनी केले.तर आभार कवयित्री पौर्णिमा लोध यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,दाई जंगो रायताड गोंडीयन बहूउद्देशीय संस्था आणि आफ्रोट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.