पिक विमा फक्त एक रुपयात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी कापूस सोयाबीन तुर पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावा असे आव्हान प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.शेतकरी दरवर्षी पिकविमा काढायला विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम भरून विमा काढला जात होता परंतु यावर्षी शासनाने केवळ एक रुपयात विमा काढायची सोय उपलब्ध करून दिल्याने सर्व शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवू लागले आहेत.तर csc
केंद्र चालकांकडून एक रुपया पैसा जादा रकमेची
मागणी करुन शेतकऱ्यांना लुबाडून नये असे आव्हान प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना सहभागी होता येते.राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे.काही csc केंद्र चालकांकडून एक रुपयाऐवजी जास्त रक्कमेची आकारणी होत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शेतकरी अर्जासाठी
csc सेंटरला कंपनीद्वारे ४० रुपये देण्यात येते शेतकऱ्यांकडून जादा शुल्काचीआकारणी करु नये .केल्यास प्रहार सेवक विनोद उमरे यांना कढवा.