जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-केंद्र सरकारने हर घर जल उदिष्ट ठेवून गावा गावात जल जिवन मिशन अंतर्गत लाखोंचा निधी देत पाण्याची सोय करिता कुटुंबांना नळ कनेक्शन जोडणी करुण लोकसंख्येच्या क्षमतेच्या आधारे पाण्याची टॉकी पाण्याची विहीर बांधण्यात आली पंप स्विच्छ रुम बांधकाम पूर्ण करून अनेक गाव विद्युत पुरवठा विना जल जिवन पाणी पुरवठा थांबली असे चित्र दिसुन येते उन्हाची चाहूल लागली आहे.
काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत महिलांना कोसो दूर पाण्यासाठी भटकंती करावी लागतो अस असतांना सुद्धा अनेक दिवस लोटून सुद्धा नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिकांना पाण्याकरीता भटकंती करावी लागतो, त्यामुळे नागरीकांमध्ये नाराजी सुर दिसुन येत आहे.काही गावात बांधकाम अपूर्ण तर बांधकाम संथगतीने / ठप्प तर काही ठिकाणी ठेकेदाराने गावातील नळ जोडणी करतांनी रस्त्या फोडून पाईप लाईन केली त्या रस्त्याची दूरस्ती अजूनही केली नसल्याने गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काही ठिकानी पाण्याची टंचाई भासत आहे त्यामुळे अनेकाना पाण्याकरीता कोसोदूर जावून पायपिठ करावा लागतो हिच का हर घर जल मिशन योजना अशी नागरिका मध्ये चर्चा रंगु लागली आहे.
“काही गावात पाण्याच्या टाकीचा काम पूर्णत्वास तर काही गावात संथगतीने कामे सुरु आहे काही पंप वर विद्यूत मिटर न लागल्याने नागरिकांना पुन्हा किती दिवस पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल” लवकरात लवकर नळ सुरु करावेत असे आवाहन कोलारा ग्रामपंचायत सदस्य गणेश येरमे यांनी केले.