Breaking News

क्रांती नगर मधील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील क्रांती नगर येथील डबक्यात पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील नागरिकांना साचलेल्या पावसाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.चिमूर शहरातील क्रांती नगर येथे रिकाम्या जागेवर पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

नगर पालिकाच्या दुर्लक्षामुळे क्रांती नगर येथील रिकाम्या जागेवरील पाणी निघन्यास मार्ग काढला नसल्याने या ठिकाणी अनेक महिन्यांपासून पाणी साचून असल्याने या पाण्याची दुर्गंधी येत आहे. जमा असलेल्या खराब पावसामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. नगर परिषद ने लवकरात लवकर पाणी जाण्यासाठी मार्ग काढला नाही तर क्रांती नगर परिसरात रोगराई वाढण्याची शक्यता लक्षात घेता पाणी बाहेर काढावे असे मागणी नागरिक करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved