Breaking News

एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाखांचा दंड

मुंबई दि. २७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाख ०३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

  • अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख १६ हजार ७०४ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
  • राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २६ जून या कालावधीत
  • पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २८५ (८६० व्यक्ती ताब्यात)
  • १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार फोन
  • राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ४ लाख ६९ हजार २७५.
  • अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
  • जप्त केलेली वाहने – ८४ हजार ८८७
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५७
  • (मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस,  ठाणे ग्रामीण २ पोलीस १ अधिकारी, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)
  • कोरोना बाधित पोलीस – १०५ पोलीस अधिकारी व ८७१ पोलीस कर्मचारी

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य …

तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved