खामगाव-बोथली व सावरी येथील शेतकऱ्यांची निवेद्ना द्वारे मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- खामगाव. बोथली. व सावरी येथील शेतशीवरातील वाघांचा बंदोबस्त करा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे
चिमूर तालुक्यातील खानगाव हे गाव जंगलालगत असून नेहमी वन्य प्राणी फिरत असतात. शेतामध्ये हरभरा. गहू. ज्वारी. ही पिके असून वाघाच्या वास्तव्यामुळे व शेतातील उभी पिके कापण्यास शेतात मजूर काम करण्यास तयार नाही. काही महिन्यापूर्वी अंकुश श्रावण खोब्रागडे या युवकाला वाघाने ठार केले होते.
जंगलालगत १५ फूट जाळीचे कंपाऊंड तयार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाला केली होती मात्र वनविभागाने अजूनही दखल घेतली गेली नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अजूनही वाघाची दहशत कायम आहे.खाणगाव या परिसरातील वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करून जंगलालगत १५ फूट तारेचे कुंपण वन विभागाने करून द्यावे यावे मागणीचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांना खामगाव. बोथली. व सावरी येथील शेतकऱ्यांनी दिले यावेळी प्रमोद पाटील. गौतम पाचभाई. रवींद्र चौखे. राजेंद्र रामटेके. रवींद्र शेंडे. लक्ष्मण पाटील. शंकर गजभीये. उपस्थित होते.