सर्वत्र अभिनंदन व कौतुक
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674
(भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेंतर्गत ८ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलच्या ५० परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सलग चौथ्या वर्षी विवेकानंद स्टडी सर्कलने निकालाने गगनभरारी मारली आहे.
शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक मागास व दुर्बल घटकाअंतर्गत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये असे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे दिली जात असल्याची माहिती स्टडी सर्कल च्या वतीने देण्यात आली.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची कठोर मेहनत स्टडी सर्कल च्या वतीने मोफत NMMS टेस्ट सिरीज आणि MAT शिक्षक मंगेश बनपुरकर, SAT शिक्षिका दर्शना सार्वे, कस्तुरबा गांधी विद्यालय तथा महाविद्यालयाचे प्राचार्य संजीव कुकडे, ओंकार शेंडे, विकास धरमशहारे, एस. पी. खोब्रागडे, युवा प्रतिष्ठानचे शैक्षणिक उपक्रम प्रमुख हेमंत (सोनू) शेंडे शैक्षणिक उपक्रम प्रमुख (युवा प्रतिष्ठान), प्रशांत बोरकर, हिरालाल बाभरे यांना दिले असून त्यांचे अभिनंदन अनिता बुजाडे महिला प्रमुख (युवा प्रतिष्ठान), दशरथ वाट, मिलिंद बाभरे, सेवानिवृत्त मेजर ऋषि वंजारी, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर व सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गानी अभिनंदन केले आहे. तर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
निकालाची परंपरा कायम
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत सन २०२१ – २२ मध्ये २२ पैकी ११ व २०२२ – २३ मध्ये ३० पैकी १५ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते.यावर्षी सन २०२३-२४ मध्ये ५० पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. निकालात अव्वल ठरली आहे. ४० पैकी बेलगाव येथील कस्तुरबा गांधी विद्यालय तथा महाविद्यालयात ३७ विद्यार्थी व अन्य शाळेत तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल यावर्षी कायम राखल्याने शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे विशेष.