Breaking News

चिमूरमध्ये पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने नगर परिषदेची पोलखोल – पाणी साचल्याने नागरिक मात्र त्रस्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सतत उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना शुक्रवारचा दिवस काहीसा दिलासा देऊन गेला. सकाळपासून उष्णतेचा त्रास होत असताना गुरुवारी रात्री अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळे, दाट ढग आले. त्यानंतर सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाल्याने उकाडा आणि आर्द्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. तर काही लोकांसाठी पाऊस अडचणीचा ठरला.


चिमूरमध्ये पहिल्याच पावसात राजीव गांधी नगरमध्ये पाणी साचल्याने नगरपरिषदेचा पर्दाफाश झाला. पावसामुळे राजीव गांधी नगरमध्ये पाण्याबरोबरच चिखलाचेही साम्राज्य होते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी या प्रभागातील नाल्याच्या खोदकामाचे काम ठेकेदाराने केले, मात्र काँक्रिटीकरणाअभावी संपूर्ण संकुल जलमय झाले होते. नाला खोदल्यामुळे चिखल झाला होता. प्रभागातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने या प्रश्नाकडे वेळीच लक्ष न दिल्यास नागरिकांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

चोपडा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- दिनांक 16/05/2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved