Breaking News

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव मुठीत घेऊन तुंब पाण्याने भरलेला पुलावरून घरी जाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आपल सरकार मोठ मोठया योजना काढत आहे पण ग्रामीण भागतील शालेय विद्यार्थी साठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही कधी बस वेळेवर नाही तर वसतिगृह सुद्धा कमी आहे. कोसरसार ते बोडखा मार्गावर वर्षापूर्वीचा पुल आहे या पुलावरून 25 वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ जाणे येणे करतात पण मुसळधार पावसाने दोन तासात पाण्याची पातळी वाढून पुलावरून पाणी वाहू लागते बोडखा मोकाशी गावाला जाण्या येण्यासाठी एकच मार्ग आहे.

शालेय विद्यार्थी कोसरसार व वरोरा शाळे मध्ये शिक्षण घेत असुन विद्यार्थीला गावाला जाण्यासाठी जिव मुठीत धरून पाण्याच्या प्रवाहा मध्ये जावे लागते. जर कोणत्या विद्यार्थीला पुल ओलांडताना काही कमी जास्त झाले तर प्रशासन जबाबदारी घेणार काय? वारंवार प्रशासनला, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाला माहिती देऊन सुद्धा पुलाचे बांधकाम, नाल्याचे खोलीकरण, रोडचे बांधकाम अजून सुद्धा झाले नाही. शालेय विद्यार्थी चे सामान्य पालक यांनी कुणाकडे मदत मागायची फक्त शहराचा विकास,गावाचा समस्या कधी मार्गी लागणार अशी ग्रामीण भागातील जनतेच मत आहे. सरकार नि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडवावे अशी जनता मागणी करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved