केवलसिंग जुनी शिवसेना उपतालूका प्रमुख (उ.बा.ठा.) तर्फे मांगणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा दिवसेनदिवस हमले होत असून त्यात एकाच दिवशी पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांना हल्ला चढवून जखमी केले. अश्या प्रकारे अनेक ठिकाणी वन्यप्राण्याकडून शेतकरी, गुराखी किंवा अन्य सामान्य माणसावर हमले होत आहे. अनेकांचे जिव गमवावे लागले व अनेक जखमी होऊन अपंग सुद्धां झाले आहे. अश्या शेतकऱ्यांना (नागरीकांना) वनविभागाकडून तात्काळ मदत देण्यात यावी व वन्य प्राण्याचे बंदोबस्त करण्यात यावे. शेतकऱ्याचे शेतामध्ये जाने व काम करणे अवघड झाले आहे. वाघाची व डूकरांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गावा,शहर,घरामध्ये आपले राहण्याचे ठिकाण वन्य प्राणी करीत आहे.
त्यामुळे नागरीकांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात लागवड करतात व उभ्या पिकाची नुकसान वन्यप्राण्यांकडून होत असते. तसेच पाळीव प्राण्याचे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार किंवा जखमी झालेल्यांची नुकसान भरपाई वनविभागाकडून योग्य प्रमाणात देण्यात यावी.कधी कुणाचे चेहरे पाहून पंचनामे केली जाते,कुणाकडून टक्केवारी घेतली जाते तर कुणाकडून ओली पार्टी घेतली जाते अश्या प्रकारचे पंचनामे वनविभागाकडून होत असते. बरेच लोकांना नुकसान भरपाई मिळत नाही. अश्या अधिकारी व कर्मचाऱ्याची वरीष्ठ अधिकाऱ्यान कडून चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केवलसिंग जुनी शिवसेना उपतालुका प्रमुख (उ.बा.ठा.) कडून होत आहे.