जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून माकडांनी हैदोस मांडला आहे, मात्र वनविभागाने अजूनही बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे माकडांची धुमाकूळ दिवसेनदिवस वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“या परिसरात सर्वाधिक माकडांचा धुमाकूळ (उपद्रव)”
कोरपना शहरातील टेलिफोन एक्सचेंज, इंदिरानगर, शिवाजीनगर, बाजारवाडी, जिल्हा परिषद शाळा परिसर, रामनगर, वसंतराव नाईक विद्यालय परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, राजीव गांधी चौक , गाडगेबाबा नगर, गजानन बाबाआनगर,शारदा मंदिर परिसर, पटेल पार्क कॉलनी, ग्रामीण रुग्णालय परिसर आदी भागांत माकडांनी सर्वाधिक धुमाकूळ माजविला असून या भागांत माकडांच्या बंदोबस्तासाठी विशेष टीम तयार करून मोहिम राबविणे आवश्यक आहे. याकरिता वनविभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.