( यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान )
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव:-सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा यंदाचा माणिक रत्न पुरस्कार राळेगाव येथील शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना जाहीर झाला आहे.ग्राम स्वराज्य मंच द्वारे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.21 जाने.2024 रोजी भावे मंगल कार्यालय यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्राम स्वराज्य मंच संचालिका आशाताई काळे,तर प्रमुख अतिथी म्हणून खा. भावना गवळी,माजी आ. वामनराव चटप,माजी मंत्री प्रा. वसंत पुरके,भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भूतडा,माजी जि. प. अध्यक्ष प्रवीण देशमुख,गोंडवाना प्रदेश कार्याध्यक्ष बळवंत मडावी,आदी मान्यवर उपस्थित असतील.स्वागताध्यक्ष कृष्णाजी भोंगाडे असतील.आयोजन समितीचे अध्यक्ष मधुसूदन कोवे गुरुजी,संस्थापक अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच व प्रा. मोहन वडतकर,गिरीधर ससनकर,रेखाताई निमजे,ह्या असतील.शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामं केले. गोर -गरीबाची सेवा करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन माणिक रत्न हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
लहानपणीचं वडिलांचे छत्र हरवले. त्या नंतरच्या संघर्ष|तुन जगण्यातील विविध अडचणी जवळून पाहिल्या. गोर -गरीब व गरजू नागरिकांना मदत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. राळेगाव येथे साई सेवा केंद्राची मुहूर्तमेढ रोवल्या जात आहे. स्त्री -आधार केंद्राच्या माध्यमातून गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे. ग्राम स्वराज्य मंच द्वारे माणिकरत्न पुरस्कार जाहिर झाल्याची माहिती नुकतीच मंच च्या सन्माननीय सदस्यांनी दिली. पुरस्कार मिळावाच ही अपेक्षा नव्हती नाही सुद्धा.मात्र गरजूच्या हाकेला ओ देऊन मदतीचा हात देण्याची दखल घेतल्या बाबत त्यांचे आभार.
-शशिकांत उर्फ बाळू धुमाळ राळेगाव.