जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-रमाई हया उदंड मानवतेच्या प्रतिक समजुतदार सोज्वळ सात्विक चारित्र्याची मंगल प्रतिमा होत्या आज समस्त स्त्रीयांचे स्वतंत्रपनाचे जगन्याचे कारन रमाई आहेत ममता प्रेमाची व्याख्या कारून्य भोळेपना बाबासाहेब यांच्या आयुष्यावर निस्सीम निरपेक्ष निस्वार्थी कुठलिही तक्रार न करता संसाराची तडजोड करुण समाजाच्या उथानासाठी समाजाचे दुख वेचण्यासाठी बाबासाहेबांच्या जिवनसगिनी बनुन ज्ञानदिव्याची वात बनुन साथ दिली आनी समतेच्या बौद्धवीचारांच्या वीचारांची घोट रमा प्याली व बाबासाहेब यांचे स्व्प्न साकार करण्यासाठी हिमालयाची उर्जा बनुन सावली झाल्या कधिच चैन सूखाची अपेक्षा केली नाही.
बाबासाहेब म्हणायेचे आयुष्याची गनिते खुप कठिण होती पन रामूनी ती अचुक सोडविली म्हणून मी शून्यातुन जग निर्माण करु शकलो रमा खरी धणवाण आहे तिचि खुप उधारी आहे माझ्यावर मी कधिच फेडू शकनार नाही तिच्या मुळे माझी पाऊले निर्भय झाली न्याय समतेच्या हक्कासाठी लढनारी ती माझी खरी लेखनि झाली कर्तव्याची जान वैचारीक खाण रमाई होत्या बाबासाहेब रमाईला काहिही न बोलता फक्त रमाई चे ऐकत राहायेचे त्यातच ती आयुष्यातिल संपुर्ण सुख मानत असे कधीही रमाई नी दुखाचा कांगावा केला नाही की सहानूभूतीची आस नाही काटयाची वाट दुखाचे भरलेले ताट व वेदनांची साथ होती औषधावीना अपत्य गमावले तरी बाबासाहेब यांची लढाई थांबू दिली नाही कधीही दुखाचा लवलेश नाही तक्रारीचा पाढा कधिच केला नाही.
वीचारांची उंची हिमालयाहूनही उत्तुंग होती म्हणून समाजाच्या प्रेमासाठी हितासाठी त्याग व समर्पण काय असते हे शीकायेचे असेल तर या संपुर्ण जगात रमाई ह्या एकच विद्यापीठ आहेत असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत यांनी नेरी येथे महामूनी बौद्धविहार लोकार्पन व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शणात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष भारतीय बौधमहासभा राज्याअद्यक्ष दीनेश हनूमते होते तर बौधविहाराचे उद्घाघाटक चिमुर पोलिसनिरीक्षक मनोज गभने प्रमुख पाहुणे भंते धम्म सारथी भंते धम्मचारी मंजूकिर्ती सरपंच रेखाताई पिसे ग्राम पंचायत समिती सदस्य उषा कामडी शिवसेना तालूका अद्यक्ष श्रीहरी सातपूते हे होते.
तर उपसरपंच शंकर दडमल आदी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत म्हणाल्या रमाईच्या अबोल स्पुर्ती व प्रचंड प्रेरनेमुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी त्यांच्या सुरक्षा साठी भारतीय सवीधानात वेगवेगळे कायदे केले आहे तरी काहि स्त्रीया छोट्या छोट्या गोष्टी मुळे खचुन जातात जगन संपवयाला निघतात समाधानी नसतात मानशिक सामर्थ्य गमवतात त्या सर्व स्त्रीयांनी रमाईचा काटेरी वाटेवरचा प्रवास समजून घ्यावा रमाई सारखे धीटबनुन कुठ्ल्याही वादळी दुखात सामर्थ्यवान बनावे यावेळी रमाई घरकुल योजना बार्टी च्या स्पर्धापरिक्षेची महिती सुधा समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीणा राऊत यांनी केले तर संचालंन सूशांत इंदूरकर आभार शालीनी साखरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास राउत छबीला टेंभूरने माला सहारे आदीनी मेहनत घेतली.