जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-दिनांक १० फरवरी २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला.या दिवसाचे काय महत्त्व आहे हे अधोरेखित करणारा दिवस कारण आपली जीवनशैली बदलली आहे खानपान बदलेल आहे.आणी आपण धकाधकीच्या जीवनात जगत आहोत.पाश्चात्य देशातील लोकांनच खानपान आपण अंगिकारले आहे.म्हणुन आज आपण अनेक आजारांना बळी पडत आहोत.ते होवू नये म्हणून हा अधोरेखित करणारा हा दिवस आहे.२०२३ हे कड धान्यं त्रुन धान्यं,भरड धान्य वर्षं म्हणून घोषित झाले.आज आपल्याला जागतिक स्तरावर यांचा निर्णय घ्यावा लागला.कारण आपण आपल्या खांद्य्य संस्कृती ला विसरलो आहोत.आपण ज्या प्रदेशात राहतो.तेथील वातावरणानुसार आपलं खानपान असायला पाहिजे.आणी आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये भरपूर पोषक असणारे पदार्थ, धान्य, सोडून आपण ते पीज्जा,बर्गर, सारखें पदार्थ खातो आणि आपली तब्येत बीघडवतो.
आपल्या कळील वातावरणात जे मोसमा नूसार अन्नधान्य तयार होतात ते आपण आपल्या जेवणात त्यांचा उपयोग केला पाहिजे.भरड धान्य,त्रुन धान्य, कडधान्य हे कमी खर्चात जास्त पोषक आहार देणारे उत्पादन आहे.आपण त्यांचा उपयोग केला पाहिजे.भगर ,नाचनी रागी,मुग,मोट,चना,वटाना, ज्वारी,बाजरा,गहू शेंगदाणे इत्यादींचा वापर करायला पाहिजे.आजकाल बंद डबा ,पाॅकेट भरपूर खाद्यपदार्थ मिळायला लागलें आहे.आणी आपण त्यांचा वापरही वेळोवेळी करायला लागलो आहोत.आणी त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होवू लागला आहे.त्यामुळे बरेच लोक विविध आजारांना बळी पडत आहे.यावर उपाय म्हणून आपण आपलं खानपान बदलायला पाहिजे.आपली जे खाद्यपदार्थ तेच घ्यायला पाहिजे.
ही सर्व माहिती सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी भरतीसाठी असलेल्या सर्व रूग्णांना दिली.यामध्ये आपरेशन झालेले रुग्ण, डिलिवरी झालेल्या माता, डिलिवरीसाठी भरती झालेल्या माता त्यांचें नातेवाईक यांना देण्यात आली सोबत श्रीमती इंदिरा कोडापे परिसेवीका,पूजा रोडे अधिपरिचारीका, प्रणाली गाथे अधिपरिचारीका यांनी भाग घेवून हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी व सर्व टिमनी मेहनत घेतली,वंदना विनोद बरडे अधीसेवीका ह्या नेहमीचं विविध माध्यमांचा वापर करून आरोग्यदायी संदेश जनतेपर्यंत पोहचवत असतात.ऊदा.व्हाट्सप ग्रुप, फेसबुक, स्टेटस, पेपर , भाषणं, वेगवेगळे कार्यक्रम यात भाग घेवून त्यांचा प्रचार व प्रसार करून आरोग्यदायी जनजागृती करत असतात.