जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र परीसर हे जलमय झाले असल्याने नेकांच्या घरी पाणी शिरले असता कुणाचे अन्न धान्याचे तर कुणाची घरे पडल्याची चित्र बघायला मिळत आहे.अशातच चिमूर शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवाशी विमलबाई बंडे यांच्या घराची भिंत अती सततधार पावसामुळे कोसळली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
माहिती मिळताचक्षणी चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनने सर्व पदाधिकारी तथा सदस्यगन यांना बोलावून विमलबाई बंडे यांच्या घराकडे धाव घेत प्रत्यक्षदर्शी पहाणी केली आणि विमलबाई बंडे यांना मदतीचा हात म्हणून आर्थीक मदत दिली. यावेळी गौतम पाटील, अक्षय नागरीकर, रोहन नंन्नावरे, अमित मोदी, विलास मोहिनकर , प्रवीण मोदी ,सुनील हिंगणकर,शार्दूल पचारे आदी उपस्थित होते.