Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-काल महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील 13 करोड जनतेवर होत आहे आणि दूरपर्यंत होणार आहे, संविधानाची पायमल्ली करून आपल्याला सोईस्कर होईल या पद्धतीने कायद्याची तोडमोड करून सत्ता कशी ताब्यात घेता येईल हे भाजपा करीत आहे, अनेक आमदार आणि खासदारांच्या बाबतीत भाजपा षडयंत्र करून, पैसा देऊन, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आज महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचाऱ्याना बीजेपी आपल्या पार्टीत घेत आहे.

शिंदे, राणे, अजित पवार असे वेगवेगळे मोहरे वेगवेगळ्या आघाडीवर पाठवून मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांना व्यवस्थीत हाताळत आहेत, भ्रष्टाचाराने माखलेले चेहरे घेवून भाजपा देश्यात अस्थिरता निर्माण करीत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांमुळे संतप्त व दु:खी झालेल्या जनतेने हे जाणून घेतल पाहिजे की भारतातील पारंपरिक पक्षांचे नेते जनतेच्या सेवेसाठी राजकारणात नाहीत. ते सत्ता, भ्रष्टाचार, प्रसिद्धी, आर्थिक फायद्यासाठी राजकारणात आहेत ते विचारधारा, पक्ष किंवा लोकांशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. ते लोक सेवेमुळे नाही तर त्यांच्या जाती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पैशाच्या ताकदीमुळे निवडून आले आहेत. अशा राजकारण्यांना भाजपा ईडी, सीबीआय, आयटीच्या रडारखाली वाकवून पक्ष बदलण्यास किंवा आपल्याला सपोर्ट करण्यास भाग पाडत आहे.

परंतु महाराष्ट्रातील जनतेला “आम आदमी पार्टी” म्हणजे आशेचा किरण आहे, आप एकमेव असा पक्ष आहे जो सीबीआय आणि ईडीच्या चुकीच्या कार्यवाहीनंतरही अखंड आणि वैचारिकदृष्ट्या एकजूट आहे. चिखलाच्या राजकारणात आदर्श म्हणून उभे राहण्याची फक्त आप कडे ताकद आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीच आणू शकते, कारण भ्रष्ट राजकारणात आप सारखा एकमेव प्रामाणिक पक्ष हा लोकांचे भले करू शकतो आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली आणि पंजाब मध्ये आप ने जे सामान्य लोकांसाठी काम करून दाखविले आहे तोच जनतेसाठी मोठा पुरावा आहे.

या प्रस्थापितांच्या विश्वासघातकी, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारणाच्या विरोधात सर्व जनतेला एकत्र येऊन लढावे लागेल व मत पत्रिकेतून या सर्व प्रस्थापित भ्रष्ट राजकारण्यांना उत्तर द्यावं लागेल असे वक्तव्य आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस आम आदमी पक्षाचे राज्याचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या सोबत विभागीय नेते मा. मधुकर फर्डे, जिल्हा अध्यक्ष मा. मुरालीलाल पचौरी, उपाध्यक्ष मा सतीश सलुजा, जिल्हा प्रवक्ता सौ. अक्षरा पटेल, शहर कार्याध्यक्ष मा. अशोक वाल्मिकी, रमेश वर्मा, हर्षल घाडगे, डोंबिवली कार्याध्यक्ष विनोद गुप्ता, बदलापूर अध्यक्ष कैलास कटके, मीडिया प्रमुख अमर आमटे, सोशल मीडिया प्रमुख अशोक यादव इत्यादी नेते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री …

‘माझ मत माझा अधिकार’ 13 मे रोजी मतदान

लक्षात ठेवा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बाकीची काम त्याच दिवशी करायला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved