प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगाव
9960051755
शेवगांव:-शेवगांव येथील रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कथेच्या कार्यक्रमानंतर काल रात्री 21 ऑगस्ट शनिवार वेळ रात्री 10:25 असेल काही माता भगिनि मंडपाच्या एका कोपऱ्यात बसल्याल्या दिसल्या. हा प्रकार कृष्णा राजीव राजळे यांच्या लक्षात आला. त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन आपुलकीने विचारपूस केली असता त्या गदेवाडी च्या होत्या व त्या ठिकाणी फराळ करत बसल्या होत्या. कृष्णाजी त्यांना म्हणाले फराळासाठी काही आणु का? त्या म्हणाल्या सगळं आहे काही नको. आम्ही घरून घेऊन आलोय. बरं मग काय सेवा करू तुमची तुम्हाला घरी जायची व्यवस्था करतो. त्या म्हणाल्या आम्ही रोज इथेच मुक्कामाला असतो आम्ही सकाळी एस टी ने गाडेवाडीला जातो. त्यातील एक आजीबाई म्हणाल्या मोनिकाताई चे चिरंजीव ना त्यावर कृष्णा म्हणला हो आपण बरोबर ओळखले, त्यातील एक आजीबाई पुन्हा म्हणाली तुमचा चेहरा राजीवभाऊ सारखा दिसतो आहे त्यामुळे लवकर ओळखले .त्यातील एक बाबा म्हणाले राजाभाऊ गदेवाडी ला की आमची नेहमी विचारपुस करायचे. आपण तशीच विचारपुस केली कृष्णादादा म्हणाला निघतो मी व त्या सर्वांचे दर्शन घेऊन तो तिथून घरी गेला.
*ताजा कलम*
सांगायचं तात्पर्य असा आहे की संस्कार हे रक्ताच असतात आई-वडिलांकडून ते आपल्याकडे येत असतात. तोच बाणा तोच अंदाज तेच संस्कार तेच विचार लवकर नवा अध्याय सुरु होतोय कृष्णा राजीवजी राजळे
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार