Breaking News

वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे

वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे

वाढदिवसानिमित्त वृक्ष देऊन वृक्षारोपण

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- मानवानी स्वत:च्या स्वार्थापोटी वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. त्याचा परिणाम ऋतू चक्रात होत असतो. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आणि कोरोना (कोव्हीड) मध्ये कित्येकांना ऑक्सीजन अभावी मृत्युमुखी पडावे लागले. तेव्हा वृक्षाचे महत्व सर्वांना कळले आहे. म्हणून पुथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक मानवाने आपल्या वाढदिवसाला रक्तदानाबरोबर वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन भंडारा जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधिक्षक जी. एस. खरडे यांनी केले.

ते भंडारा येथील समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन यांच्या विद्यमाने आयोजित सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या‌ वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्हा कारागृहातील सार्वजनिक वाचनालयात विविध लेखकांची पुस्तके वितरण व वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.त्यावेळी भंडारा जिल्हा कारागृह प्रभारी अधिक्षक जी. एस. खरडे, तुरुंगाधिकारी संदिप क्षिरसागर,‌ चला नदीला जाणूया उपक्रमाचे जिल्हा समन्वयक अविल बोरकर, सुभेदार कृष्णा बाभरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, यशवंत बिरे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल टेंभुर्णे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने कारागृहाच्या परिसरात केलेले वृक्षारोपण हे तुमची सदैव आठवण करून देत जाणार तसेच वाचनालयाला भेट दिलेल्या पुस्तकांचा उपयोग कैद्यांना नेहमीच होत राहिलं असल्याचे मत तुरुंगाधिकारी संदिप क्षिरसागर यांनी व्यक्त केले. मानव हा बुध्दीमान प्राणी आहे. तो सर्वांच्या कल्याणाकरिता वेळ वाढतो. मात्र स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ देत नाही. म्हणून माणसाला चांगले आयुष्य जगायचे असल्यास रोज योग प्राणायाम करावे. असे मत चला नदीला जाणूया उपक्रमाचे जिल्हा समन्वयक अविल बोरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर नवाज यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशवंत बिरे यांंनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिपाई प्रभाकर वैरागडे, स्वप्निल भोयर, यशवंत थोटे, विवेक चटप, संस्कार केजरकर, प्राची चटप, अर्चना ढेंगे, सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved