वर्धा-सुरज गुळघाने
वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये गारपीट व पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार व कृषिअधिकारी वर्धा यांना देण्यात आले.यावर्षीच्या हंगामात गहू व चणा पिक फार जोमाने वाढले होते मात्र शेवटल्या क्षणी हाती आलेले पीक उध्वस्त झाले त्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहे गारपिटाने गहू, मिरची कांदा या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या अशे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देण्यासाठी माजी उपसरपंच भुषण झाडे, शिवसेना सचिव सुरज गुळघाणे, प्रवीण चांभारे, महेश चांभारे, राहुल चांभारे,सचिन बोरकर, केतन बोरकर , महेश गुळघाणे, देवांशु गुळघाणे, सुधीर वाघमारे, निलेश गेडाम, जगदीश कलोडे, लक्ष्मण तिमांडे, राजू बोरकर, सचिन बोरकर, प्रफुल बुरीले, पवन गुळघाणे, तुषार कडू, गणेश डोळस्कर, संदीप श. बोरकर आदी कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.