Breaking News

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने कोणत्याही वेळेला मालवाहू वाहने लागत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून दूचाकी वाहने व बाजारपेठेत वस्तू खरेदी करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

सर्वात जुनी आणि महत्वाची बाजारपेठ असलेल्या रोडवर भरपूर प्रमाणात अतिक्रमण वाढले असून जुनी वस्ती असल्याने एकाही प्रतिष्ठान समोर पार्किंगची व्यवस्था नाही. अश्यातच रोड अरुंद असल्याने मोठे वाहन निघण्यास अडचण निर्माण होत असून मोठे मोठे व्यापारी आपआपल्या प्रतिष्ठान समोर मालवाहू वाहने तासनतास उभे करताना दिसून येते. कधी कधी तर दोन्ही मोठे वाहने सारखेच लाऊन ठेवताना आढलले असून जाण्या-येण्याचा पूर्ण मार्ग बंद केल्याचा प्रकार सुधा घडला आहे. ग्राम पंचायत कार्यकाळात मालवाहक वाहनांना प्रवेश बंदी केली होती. पण नगर परिषद कार्यकाळात मात्र नगर परिषद प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे गरजेचे – प्रशांत खोब्रागडे

सिल्ली येथे संस्कार मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- प्रत्येक नागरिकांना वाटत असते की, माझ्या …

नागभिड पोलीसांनी नाकेबंदी करून पकडली जनावरांची गाडी

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभिड:-पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत आज दिनांक 05/05/2024 रोजी मुखबीर चे खात्रीशीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved