ज्यांनी शहराला वर्षानुवर्ष पाण्यासाठी रडविले बाह्यवळण रस्ता रिंग रोड केला नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही ~ सर्वसामान्य “मी शेवगावकर”
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराचा गेल्या कित्येक वर्षापासून गंभीर असलेल्या पिण्याचा पाणी प्रश्नावर तालुक्याचे आमदार जिल्ह्याचे खासदार आणि प्रशासकीय अधिकारी मुग गिळून गप्पा आहेत आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली आज सुमारे 88 कोटी रुपयांची पाणी योजना युती सरकारच्या काळात कोणी रखडवली शेवगावकरांना जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न कोण करत आहे??? आता लोकसभा आणि त्या मागे विधानसभा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यात शेवटी नगरपालिका अशी निवडणुकांचीम रांग लागलेली आहे परंतु ज्यांनी वर्षानुवर्षी शेवगावकरांना पाण्यासाठी झुलविले रस्त्याची कामे रखडविली आम्हाला निवडून द्या प्राधान्याने शेवगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावू व सहा महिन्यात तुम्हाला बाह्यवळण रस्ता रिंग रोड देऊ आशा वल्गना करणाऱ्यांनी तालुक्यात कुठं जमिनीवर घमेलभर डांबर टाकलं नाही.
याची जाणीव शेवगाव शहरवासीयांनी ठेवली पाहिजे राष्ट्रीय प्रश्नांचे भांडवल करून मताचा जोगवा मागवायचा आणि शेवगाव शहर आणि तालुका विकासापासून कोसो दूर ठेवायचा हे पाप करतोय कोण??? – ज्यांना लोकसभेच्या विधान सभेचे उमेदवार पटत नाहीत त्यांनी “मारा नोटा यांच्या पाठीत हाना सोटा” या उक्तीप्रमाणे सर्व पुढाऱ्यांना एका लाईनीत उभे करून सब घोडे 12 % या उक्तीप्रमाणे आधी शेवगाव शहराची पाणी व्यवस्था कर आणि मग मत मागायला ये असं ठाण कोण सांगितलं तर शेवगावकरांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लागेल नाहीतर भावनिक मुद्द्यांना हात घालून जनतेला वेठीस धरायच आणि शेवगाव शहराचे प्रलंबित प्रश्न ताजनापूर लिफ्ट बस स्थानकाचे रखडलेले काम भाजी मार्केटचा रखडलेला प्रश्न शेवगाच्या तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था प्रमुख राज्य महामार्ग श्रीरामपूर परळी रेल्वे महामार्ग या प्रश्नांना बगल द्यायची आणि मतांचा जोगवा मागून जनतेला येड्यात काढायचं मग तो कोणीही असो शेवगावकर यांना होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत याचा जाब मागणार या सर्व पुढाऱ्यांची अवस्था { मतांची }भीक नको पण { प्रश्न रुपी } कुत्रा वर अशी झाली आहे.
ताजा कलम
गेल्या काही महिन्यापासून शेवगा शहर पाणी कृती समितीने वारंवार प्रशासनाला शेवगाच्या पाणी प्रश्न सोडवा म्हणून अर्ज दिले आंदोलनाचे निवेदन दिले परंतु आपल्या सोयऱ्याला पाणी योजना भेटली नाही आणि भेटलेल्या ठेकेदार सुद्धा नाठाळ असून शेवगाव शहराची पाणी योजना अजून पाच टक्के सुद्धा पूर्ण झालेली नाही याला जबाबदार कोण अधिकाऱ्यांना जाब विचारला गेल्यावर ते हात वर करतात आमच्यावर दबाव आहे असं सांगतात माननीय जिल्हाधिकारी यांनी कान उघडणे करून सुद्धा रखडलेल्या पाणी योजनेचा तळ्यात मळ्यात चालू आहे शेवगा शेरवाशांचा तळताळात घेण्याचं पाप नेमकं कोण करत आहे नवरा मेला तरी चालेल पण सोबत रडकी झाली पाहिजे काहींनी “स्वतःला आमदार होण्यासाठी” मुद्दामहून ही पाणी योजना तर रखडवली नाही ना ??? असाही प्रश्न सर्वसामान्य शेवगावकर विचारीत आहेत
{ क्रमशः }
*शेवगाव शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी रडविणारे पुढाऱ्यांना गाव बंद करण्याची भूमिका घेतली पाहिजे तरच पाणी प्रश्न तातडीने मार्गे लागेल अशी सर्वसामान्यांची धारणा झाली आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*