खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674
(भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा ही आपल्या सर्वांच्या हक्काची शाळा आहे. या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका हे पालकांशी गटामार्फत तसेच प्रत्यक्ष भेट देऊन नेहमी संपर्कात राहतात. म्हणून गावातील इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्यावा. मराठी शाळेतून अनेक विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी घडून उच्च पदावर कार्यरत आहेत. म्हणून मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र वासनिक यांनी केले. ते पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंचा शितल ब्राम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र वासनिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अश्विनी सुखदेवे, मंजुषा ब्राम्हणकर, नमिता सुखदेवे, सुषमा ब्राम्हणकर, मिनाक्षी कावळे, ग्रा.पं. सदस्य दिपक चव्हाण, अंगणवाडी सेविका शकुंतला सुखदेवे, आशा वर्कर मिनाक्षी ब्राम्हणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन व शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर व प्रमुख अतिथीचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतर्फे स्वागत करण्यात आले.
मेळाव्यात एकूण सात स्टॉल लावण्यात आले होते. आणि प्रत्येक स्टाॅलवर शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक हे पाहुण्यांना त्या स्टॉलचे महत्त्व सांगत होते. व भरती पात्र विद्यार्थ्यांकडून सर्व कृती करवून घेत होते .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन मुख्याध्यापक राहुल मेश्राम यांनी आजच्या मेळाव्याची आवश्यकता व प्रत्यक्ष कार्यवाही तसेच त्या माध्यमातून मुलांना कसा लाभ होईल याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यावेळी सुहानी आडिकने, आरूषी कावळे, बुद्धांश खोब्रागडे, समीर कावळे, अयांश सुखदेवे, रागिनी कावळे, सिआन सुखदेवे हे विद्यार्थी भरतीपात्र झाले आहेत.
सरपंचा शितल ब्राम्हणकर यांनी उपस्थित सर्व पालकांना जिल्हा परिषद शाळेत कसे व कोणते उपक्रम राबवितात तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना कसा लाभ होईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन गावची जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मानकर व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राहुल मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वी करिता सुदर्शना खोब्रागडे, सुप्रिया आडिकणे, हिना खोब्रागडे, अनिता कावळे, भारती सुखदेवे, सविता कावळे, प्रसिद्धी सुखदेवे, प्रियांशी ब्राम्हणकर, आदित्य बहेकार, सुजित मेश्राम, पुनम सुखदेवे, कार्तिक ब्राम्हणकर, तक्षशिला चव्हाण, आस्तिक खोब्रागडे, प्रतिक वासनिक, प्रेम ब्राम्हणकर, आयान मेश्राम तसेच शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनींनी सहकार्य केले.