Breaking News

रामाळा तलावाच्या खोलीकरणातून निघालेला गाळ पिकांच्या लागवडीस योग्य

शेतक-यांनी स्वखर्चाने नेण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 23 मार्च : शहरातील रामाळा तलावात वर्षानुवर्षांपासून वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणास शासनाने मंजुरी दिली असून खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या तलावाच्या गाळाची / मातीची तपासणी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा येथे केली असता मातीचा सामू, क्षारता पिकांच्या लागवडीस योग्य आहे. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही चांगले आहे.

पिकांच्या उत्पादन वाढीस आवश्यक असलेले उपलब्ध नत्राचे प्रमाण चांगले असून या मातीमध्ये स्पुरद व पालाश यांचे प्रमाण भरपूर आढळून आले आहे. मागील वर्षी या सुपिक गाळात टरबूज, कोथिंबीर, भाजीपाला पिकाची प्रायोगि‍क तत्वावर लागवड केली असता चांगले उत्पादन हाती आले. त्यामुळे शेतीयोग्य असलेला हा गाळ ट्रॅक्टर किंवा इतर साधनांनी शेतात टाकण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध आहे. या संधीचा शेतक-यांनी लाभ घ्यावा व तलावाचा सुपिक गाळ आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाने केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved