Breaking News

पत्राळ व द्रोण कारखाण्याला लागली भीषण आग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.०५/०४/२०२२ ला दुपारी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान पत्राळी व द्रोण बनविण्याच्या कारखान्यात आग लागली याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे वाहन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि आग विझविण्याची प्रक्रिया सुरू केली.काही प्रमाणात आग विझली असून आणखी आग विझविण्याची प्रक्रिया सुरुच होती. यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.परंतु चिमूर शहरातील माणिक नगर येथे अनेक वर्षांपासून हे अनाधिकृत रित्या कमी मायक्रोन च्या पंनी तसेच पंनी पासून तयार करण्यात आलेल्या पत्राळी तसेच द्रोण बनविण्याचे कारखाने सुरु आहे.

यावर शासनाने बंदी घातली असून नियमाला धाब्यावर बसवून सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन करून काही व्यावसायिक यांचा व्यवसाय जोमाने सुरूच आहे.सध्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाल्याने याची बाजारात मागणी सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहे.परंतु या व्यवसायास बंदी असतांना चिमूर शहरात कारखाना सुरू आहे याची माहिती नगर परिषद ला असतांना सुध्दा कारवाई करण्यात का येत नाही असा ? जनतेला पडलेला आहे.मागील वर्षी सुद्धा माणिक नगर येथील पत्राळी व द्रोण बनविण्याच्या कारखान्याला आग लागली होती.त्या लागलेल्या आगीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved