Breaking News

मानव विकास मिशन बस तात्काळ सुरू करा संभाजी ब्रिगेड ची मागणी

आशिष झाडे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वणी:-संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शालेय नवीन सत्र सुरू झाले आहे, त्यातच झरी जामनी तालुक्यातील शाळा आणि कॉलेज देखील सुरू झाले आहेत, परंतु परिवहन व्यवस्थेत झालेल्या दर वाढीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. झरी जामणी तालुका हा मागासलेला तालुका आहे, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना योग्य त्या वाहतुकीच्या व्यवस्था नाही, आणि आहे ते भाडे परवडणारे नाही,

त्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी त्वरित सुरू कराव्या, बस सेवा सुरू करण्यासाठि आज वणी आगर व्यवस्थापकला भेट दिली असता आगर प्रमुखाशी चर्चा केली, तेव्हा असे दिसून आले, की,बस सेवा सुरू करण्यात येत आहे,

पण वेळ या साठी लागत आहे.की झरी तालुक्यातील कोणत्याही शाळा मुख्याध्यापक, कॉलेज चे प्राचार्य यांनी आगर प्रमुखाकडे विद्यार्थी संख्या व बस चालू करण्यासाठी पत्रव्यवहार केला नाही, त्यामुळे बस सेवा सुरू होण्यास वेळ लागतो आहे.पण संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आशिष झाडे याने शाळा व कॉलेज व्यवस्थापक यांना आव्हान केले आहे,की जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आम्ही उपोषणाला बसू त्यासाठी शाळा कॉलेज व वणी आगार जबादार राहील.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved