Breaking News

बोगस पशु विमा फसवणुकी पशु मालकांनी सावध रहावे ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे : – हल्ली गुन्हेगारांनी शेतक-यांना व ग्रामीण भागातील जनतेला फसवण्याचा व आर्थिक गंडा घालण्याचा एक नविन प्रकार सुरु केला. हया गुन्हेगारांचे राहणीमान हे पॉश असून ते या बोगस स्कीमव्दारे जनतेची आर्थिक फसवणुक करीत आहेत. हे गुन्हेगार ज्यांच्याकडे म्हशी, गाय, बैल, बोकड, कुत्रा इ. प्रकारचे जनावर ज्यांच्याकडे व जे पशु मालक आहेत त्यांच्याकडे जातात व या बोगस स्कीमचा प्रसार व प्रचार करतात व त्यात ते असा दावा करतात की, हल्ली एक नविन योजना आली आहे त्यात तुम्ही एक हजार रुपये आपल्या जनावरांच्या नावाने गुंतवा आणि जर ते जनावर ठरलेल्या कालावधीत मेले तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील.

या योजनेचा अधिक तपास केला असता असे आढळून आले की, अशी कुठलीही योजना सुरु नाही किंवा आलेली नाही तरी पशु मालकांनी अशा या बोगस व फसव्या स्कीमपासून सावधान रहावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम जनतेला केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved