जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील चिमूर नगर परिषद क्षेत्रात उमा नदीने वेढा घातला असून पूर्णपणे उमा नदी हि कोरडी पडली असल्याने याचा फायदा रेती माफिया यांनी योग्य प्रकारे घेतला असून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांच्या रेतीचा उपसा माफियांद्वारे केला गेला आहे. एकिकडे यामुळे मुक्या जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.तर हिच पध्दत चिमूर शहरातील जनतेला पत्करावी लागत आहे.
घरी मारलेली बोर असो अथवा सार्वजनिक ठिकाणी मारलेली हॅन्ड पम्प व विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या असल्याने ३ कि.मी.अंतरावर असलेल्या नगर परिषद चिमूर च्या उमा नदी किनाऱ्यावरील पाणी फिल्टर प्लांट हे ठिकाण दुचाकीने व सायकल ने गाठून पिण्यासाठी पाणी जनतेला घरी आणावे लागत आहे. तर काही श्रीमंत व्यक्ती हे पिण्यासाठी पाणी प्रत्येक दिवशी ५ रुपये मध्ये १५ लिटर पाणी खाजगी फिल्टर प्लांट वरून विकत घेऊन पाणी पिऊन जीवन जगण्याचे कार्य सुरू आहे. पाण्यासाठी जनतेला कसरत करावी लागत असून विविध प्रकारचे निवेदने नगर परिषद ला दिल्या गेली आहेत तरी सुद्धा टॅंकर द्वारे पाण्याचे वाटप शहरात केले जात नसल्याने जनतेला मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाळा पैकू येथील हॅन्ड पम्प तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असाही ईशारा जनतेनी दिला आहे.चिमूर नगर परिषदेने अशा अवस्थेत कसलीही प्रतीक्षा न करता पाणी पुरवठा करावा अशी मागणी जनतेमध्ये जोर। धरू लागली आहे.