विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील एरंडगाव समसुद येथील शासकीय विकास निधी 25/15. ग्रामविकास निधी अंतर्गत एरंडगाव समसुद हद्दीतील श्रीधर आवारे वस्ती ते गंगाधर धस डी.पी. मार्गे लोखंडे वस्ती असा रस्ता कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर होऊन तीन महिने झाले परंतु भर पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था सोबतच्या छायाचित्रात जोडल्या प्रमाणे झाली आहे. एरंडगाव ग्रामविकास मंत्री. महाराष्ट्र शासन आणि आमदार यांचा संयुक्त निधीतून 25 .15. या निधीतून असणारा रस्ता गावातील हा एक प्रमुख रस्ता असून रोज या रस्त्यावरून शेकडो नागरिक महिला वृद्ध शाळकरी विद्यार्थी दूध उत्पादक शेतकरी शेतमजूर ये जा करत असतात दुखणं बहान बाजारहाट करण्यासाठी या भागातील नागरिकांना याच रस्त्याचा वापर नेहमी करावा लागतो.
म्हणून वारंवार मागणी करून ग्रामस्थांनी हा रस्ता लोकप्रतिनिधींकडून तातडीने मंजूर करून घेतला परंतु “सरकारी काम आणि सहा महिने थांब” या प्रवृत्तीचा अनुभव या भागातील नागरिकांना आला पावसाळ्यापूर्वी हा रोड व्यवस्थित होईल अशी अपेक्षा होती परंतु ढिसाळ कामगिरी करणारे प्रशासन कामात दिरंगाई आणि टंगळमंगळ करणारा ठेकेदार आणि या सर्वांकडे डोळे झाक करणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी अशा गलिच्छ शासन व्यवस्थेचा बळी या भागातील नागरिक ठरत आहेत या सर्व घृणास्पद प्रकाराला जबाबदार कोण ??? असा प्रश्न संसद एरंडगाव चे सर्व नागरिक विचारत आहेत.
*ताजा कलम*
*जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील होणारे विधानसभा इलेक्शन हे मिनी एम.आय.डी.सी. विमानतळ रेल्वे सेवा या विकासाच्या मुद्द्यांवर होताना दिसत आहे परंतु शेवगाव आणि तालुक्यातील गावांना अजून रस्ते विज पिण्याचे पाणी शेतीसाठी पाटबंधारे शेतकऱ्यांचे प्रश्न यावरच इलेक्शन होण्याची शक्यता आहे स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी शेवगाव सारखा दुर्गम तालुका अजून प्राथमिक समस्यांच्या गुंत्यात गुरफटला आहे जबाबदार कोण ???*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*